Aayushya Mhanje Khel Navhe

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे, आयुष्य एक कोडे आहे, सोडवाल तितके थोडे आहे, म्हणूनच आयुष्यात येऊन माणसे मिळवावीत, एक-मेकांची सुख दुःखे एक-मेकांना कळवावीत…

Manus Uttam Vakil Asto

माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो…

Shri Krishna Quotes Marathi

एकदा अर्जुन ने श्री कृष्णाला सांगितले: भिंतीवर काहीतरी असे लिहा की, आनंदात वाचले तर दु:ख होईल, आणि दु:खात वाचले तर आनंद होईल… . प्रभु श्री कृष्णाने लिहिले: “ही वेळही निघुन जाईल”

Dusryachi Bhukh Bhagavine Hich Sanskruti

भूख आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूख आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळे प्रसंगी स्वतः उपाशी राहून, दुसऱ्याची भूख भागविणे हिच खरी संस्कृती…